जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे महर्षी कालिदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढील आठ दिवस संस्कृत भाषा सप्ताह साजरा केला जाणार असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि भाषिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर डॉ. आर्विकर सर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व, तिचे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक काळातील उपयोग यावर सखोल विचार मांडले. त्यांनी संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ज्ञान, चिकित्सा आणि अध्यात्म यांची समृद्ध परंपरा असल्याचे अधोरेखित केले.या वेळी कॉलेजचे डीन डॉ. हर्षल बोरोले सर यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचा अभ्यास करावा, तिचा उपयोग वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, या आठवड्याच्या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा.कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक पठण, नाट्य सादरीकरण आणि कालिदासांच्या साहित्यावर आधारित सादरीकरण केले.या संस्कृत सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, भाषा आणि परंपरेबद्दल नवीन जाणिवा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर डॉ. आर्विकर सर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व, तिचे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक काळातील उपयोग यावर सखोल विचार मांडले. त्यांनी संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ज्ञान, चिकित्सा आणि अध्यात्म यांची समृद्ध परंपरा असल्याचे अधोरेखित केले.या वेळी कॉलेजचे डीन डॉ. हर्षल बोरोले सर यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचा अभ्यास करावा, तिचा उपयोग वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, या आठवड्याच्या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा.कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक पठण, नाट्य सादरीकरण आणि कालिदासांच्या साहित्यावर आधारित सादरीकरण केले.या संस्कृत सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, भाषा आणि परंपरेबद्दल नवीन जाणिवा निर्माण होण्यास मदत होणार आहे.