जळगावच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निर्णय
जळगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगांव तालुक्यातील करगाव येथील रहिवासी अविनाश विजयसिंग पाटील व त्यांची पत्नी मिनाबाई अविनाश पाटील यांचा दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी एरंडोल पोलिस स्टेशनच्या हद्यीत रस्ता अपघात झाला होता. मयतांच्या वारसांना ४६ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शनिवारी राष्ट्रीय लोक अदालती मध्ये देण्यात आला आहे.
अपघातावेळी दांपत्य हे त्यांच्या मालकिचे अॅक्टिव्हा स्कुटर कं. एम.एच.19 ईई 4717 या वाहनाने एरंडोलकडे प्रवास करत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने पाठीमागुन येणारा ट्रक कं. एम.एच. 18 बी.जे. 1066 वरील ड्रायव्हर अब्दुल रज्जाक शेख मोहम्मद याने दुचाकीला मागुन ठोस मारली. सदर अपघाताची तिव्रता इतकी जास्त होती की, घटनास्थळवरच या पतीपत्नीचा मृत्यु झाला होता. मृत्यु पश्चात त्यांना दोन मुले होते. या दुर्देवी अपघातात दोन्ही मुलांनी त्यांचे पालक गमवले.
अपघातानंतर एरंडोल पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपासादरम्यान एरंडोल पोलिस स्टेशन येथील तपास अधिकारी यांनी अपघाताला जबाबदार असलेली सामनेवाला वाहन टाटा कं. एम.एच.18 बी.जे. 1066 ही ताब्यात घेण्यात आली व तपासा दरम्यान सदर वाहनाचे चालक अब्दुल रज्जाक शेख मोहम्मद यांना अटक करण्यात आली होती. अपघातानंतर मयताचे दोन्ही मुले व मयताची आई यांना अपघाती नुकसान भरपाई मिळण्यापोटी मोटर अपघात नुकसान भरपाई प्राधिकरण जळगांव येथे अॅड. महेंद्र सोमा चौधरी व त्यांच्या सहका-यांमार्फत दावा दाखल केला.
विशेष बाब म्हणजे सदरचा दावा हा दिनांक १८ ऑक्टोंबर २०२४ रोजी कोर्टात दाखल करण्यात आला होता. केवळ सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत अर्जदारांना नुकसान भरपाई मिळाली, याचे समाधान अर्जदार यांच्या मुलांनी व्यक्त केले आहे. मयत हे यशवंत माध्यमिक विद्यालय टाकळी येथे शिपाई या पदावर कायम स्वरूपी नोकरीला होते.
त्यांना साधारण ३५ ते ४० हजार इतका मासिक पगार मिळत होता. मयताच्या उत्पन्नाला अनुसरून विमा कंपनी एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इंश्युरंन्स कंपनी यांच्यासोबत चर्चेअंती वडीलांच्या मृत्युपोटी दोन्ही मुलांना व मयताच्या आईला एकुण ४६ लाख रूपये देण्याची मान्यता विमा कंपनीकडून चर्चेअंती देण्यात आली. अर्जदारातर्फे अॅड महेंद्र सोमा चौधरी, अॅड. श्रेयस महेंद्र चौधरी, अॅड. हेमंत जाधव व अॅड. सुनिल चव्हाण यांनी बाजु मांडली. तसेच विमा कंपनी एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इंश्युरंन्स कंपनीतर्फे अॅड. जयंत फडके, अॅड शुभम त्रिपाठी यांनी कामकाज पाहीले.
सदर दाव्यात अर्जदाराच्या वकिलांनी प्रथम दर्शनिय दाव्याची व्युहरचना व कोर्टासमोर मांडलेले मुद्ये पाहता सदर दाव्यात अर्जदारांना सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आर्थिक न्याय मिळाला. सदर दाव्याचे कामकाज दिनांक 22/03/2025 रोजी झालेल्या लोक न्यायालयात पार पडले .