जळगाव (प्रतिनिधी) – संच मान्यतेत दुरुस्ती करा. शिक्षकांना अतिरिक्त करण्याचा घाट सोडा शिक्षण आयुक्तालय पुणे यांनी १३ जुलै २०२०ला पत्र काढून शिक्षक सबर्गातील पदांसाठी संच मान्यतेचे प्रस्तावित सुधारित निकष लागू करण्या बाबत अप्पर मुख्य सचिव शिक्षण यांना शिफारस केली आहे. या निकषांमुळे आता महाराष्ट्रातील शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरणार असून विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या प्रकारच्या शिक्षण आणि विध्यार्थी विरोधी प्रस्तावित सुधारित संच मान्यतेचे निकष तत्काळ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष भा.ज.पा.शिक्षक आघाडी जळगाव महानगर प्रवीण जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्य मंत्री बच्चू कडू, आणि अप्पर मुख्य सचिव यांना पाठविले आहे.


५ वी ते १० वी या शाळा प्रकारात इयत्ता ५ वी, इयत्ता ६ वी ते ८ वी आणि ९ वी ते १० वी असे ३ शालेय स्तर आहे. १८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयान्वये तिन्ही स्तरातील विध्यार्थ्यांप्रमाणे संचमान्यतेत शिक्षकांचीपदे मंजूर होत पण प्रस्तावित निकषाप्रमाणे ५ वी ते १० वी शाळा प्रकारात आजच प्रत्येक शाळेत ३-४ शिक्षक अतिरिक्त ठरणार त्यामुळे सुधारित निकषंमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होणार असून विध्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत प्रत्येक शालेय स्तरावर ३० विध्यार्थ्यास १ शिक्षक, या धोरणाशी देखील प्रस्तावीत धोरण विसंगत आहे. कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांची पदे हि मंजूर होणाऱ्या एकूण शिक्षकांच्या पदांतर्गत समाविष्ट असल्याने आता विषय शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होणार आहेत. हा शिक्षण विभागाचा सुनियोजित कट असून सदर भूमिका संशयास्पद आहे. असे मत प्रवीण जाधव यांनी मांडले आहे. शिवाय २२ मे रोजी शिक्षण मंत्री यांनी या शैक्षणिक वर्षात कोणी अतिरिक्त होणार नाही असे पत्रक काढले आहे त्याचे काय?
प्रस्तावित निकष तत्काळ रद्द करून प्रत्येक तुकडी मागे १.५ शिक्षक आणि प्रत्येक शाळेत २५० विद्यार्थ्यांमागे कला, क्रीडा व कार्यानुभव, विशेष शिक्षक स्वतंत्र पणे मंजूर करण्याचे आदेश निर्गमित करण्याची मागणी आघाडी अध्यक्ष प्रविण जाधव यांचे सह संदीप घुगे, दुष्यंत पाटील, संजय वानखेडे, परेश श्रावगी, के.एस.पाटील, आनंद पाटील, किरण पाटील, विजय गिरनारे, सतीश भावसार, प्रवीण धनगर, विशाल पाटील, पी. एल. हिरे यांनी केली आहे.







