जळगाव ( प्रतिनिधी ) – आसोदा रेल्वे गेट ते यावल या रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले मिलिंद नारखेडे व ग्रामस्थ यांनी दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर जिल्हापेठचे पो नि लीलाधर कानडे व सा.बां उपअभियंता भंगाळे यांच्या हस्ते उपोषण सोडलं
या अधिकाऱ्यांसमोर मिलिंद नारखेडे यांनी तीन दिवसात चौकशी समिती स्थापन करा अन्यथा मी दुसऱ्यांदा उपोषणाला बसेल असे सांगितले यावेळी असोदा येथील ग्रामस्थ उपस्थित होते चौकशी समिती स्थापन झाल्यानंतर समितीकडे आपण चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामाचा अहवाल व गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही साईडने पाच फुटाचा फूटपाथ व आसोदा पेट्रोल पंप ते भादली रस्ता हनुमान मंदिरापर्यंत ठिकठिकाणी स्पीडब्रेकर टाकण्याची मागणी करणार असण्याचे त्यांनी सांगितले