जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील तांबापूरा येथे काहीही एक कारण नसंताना रिक्षाचालकाला शिवीगाळ व मारहाण केली तर रिक्षाच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चंद्रकांत विष्णू अभंगे (वय-३१) रा. कंजरवाडा जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहायला आहे. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवार २२ डिसेंबर रोजी चंद्रकांत अभंगे हा तरूण सकाळी ६ वाजता घरी असतांना काहीही एक कारण नसतांना कलीम शेख फिक यांच्यासह इतर तिघांनी दारूच्या नशेत येवून बेदम मारहाण केली तर रिक्षाच्या काचा फोडून नुकसान केले. ही घटना घडल्यानंतर चंद्रकांत अभंगे याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून कलीम शेखर फिक, अजंता सलीम, बाबा आणि खलील (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. बिलाल चौक, जळगाव यांच्या विरोधात गुरूवार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.