मुंबई (वृत्तसंस्था) – उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळवल्यानंतर शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार राज्याचे नेते पण फक्त बारामतीचा विकास केला,’ असा आरोप आमदार शहाजी पाटील यांनी केला. दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी हाच धागा पकडून शरद पवारांवर निशाणा साधला.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, आमदार पाटील साहेब आपलं जेवढं अभिनंदन व कौतुक करावं तेवढं कमी… नवीन पिढीला माहीत नाही की पवार साहेबांनी पश्चिम महाराष्ट्राला फक्त बारामतीसाठी वापरले. आपण निदर्शनास आणून दिल्याबद्दल परत एकदा आभारी.
राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आह हे देशभर सांगायचं ही पवारांची पद्धत आहे. शरद पवार राज्याचे नेते पण फक्त बारामतीचा विकास केला,’ असा आरोप आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे.