जामनेर तालुक्यात गारखेडा येथील घटना
जळगांव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील गारखेडा येथील ३५ वर्षीय तरुणाचा त्यांच्या शेतातील विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे घडली आहे.
मयुर अशोक पाटील (वय ३४, रा. गारखेडा ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयूर हा दुपारी शेतात कामासाठी गेला होता. शेतात काही काम करीत असताना अचानक पाय घसरून ते विहिरीत पडले. दुर्दैवाने त्यांना पोहता येत नसल्याने विहिरीत बुडून त्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नसल्याने व ते दररोज सायंकाळी जिमला जाण्यासाठी जात असत.(केसीएन)परंतु जिमची कुलूपाची चाबीही त्यांच्या जवळ असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच जामनेर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ दीपक जाधव हे करीत आहेत.