कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष डॉ दत्तप्रसाद दलाल हे होते. तर प्रमुख उपस्थित सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश पाटील, मुख्याध्यापक जयश्री कुलकर्णी, शैलेंद्र पाटील, दीपक नगरे आदी उपस्थित होते. डॉ सुरेश पाटील यांनी सांगितले कि, आई वडील आपलें लाड पुरविताना लाखो रुपये खर्च करतात. पण आपण त्यांच्या भावनांचा विचार करीत नाहीत. अपघातात आपण बळी पडतो. आपल्या पालकांची अवस्था काय होते याचा आपण विचारच करीत नाही. वाहन निरीक्षक चौधरी यांनी सांगितले कि, अपघातात तरुणांई चे उसळते रक्त अपघातास कारणीभूत आहेत. मोबाईल बाजूला ठेवून हेल्मेट अंगीकारावे, वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. अपघात मुक्त जीवन आपले असावे यासाठी परिवहन विभाग सजग होऊन जनजागृती अभियान राबवीत आहे. शेवटी जाता जाता स्पर्धात्मक परीक्षेबाबत देखील काही बाबी सांगितल्या.
अध्यक्षीय भाषणात डॉ. दलाल यांनी सांगितले कि, तरुणांईत आपल्या शरीरातील हार्मोन्स मध्ये बदल होत असतात, पण आपण त्यावर नियंत्रण आणू शकतो. वाहन चालविण्याच्या नियमाचे अवलोकन करून आपल्या परिवारातील सदस्य यांना देखील सूचित करा. सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी करून आभार मानले.