जळगाव (प्रतिनिधी) : सामाजिक वनीकरण कार्यालयाअंतर्गत नाना पाटील, रामचंद्र दत्तू कोळी आणि शांताराम अपार हे ३ वन कर्मचारी १९८८ पासून काम करीत आहेत. त्यांना उच्च न्यायालयाच्या निकालानुसार सेवेत कायम करा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहपरिवार आक्रोश धरणे आंदोलन सुरू केले आहे.
नाना पाटील व इतर ५ कर्मचाऱ्यांनी कायम न केल्यामुळे त्यांनी औद्योगिक न्यायालय जळगाव येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या निकाल त्यांच्या बाजूला २००४ ला लागला. त्यानुसार सामाजिक वनीकरण खात्याने फक्त तीन कर्मचाऱ्यांना कायम कामगार केले. वेतन देऊन कामावर कायम केले. परंतु उर्वरित तीन कर्मचारी यांचे विरुद्ध उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी अपील केले.
त्याचा निकाल २०२२ मध्ये त्यांच्या बाजूलाच लागला. पण उर्वरित नाना पाटील वगैरे तीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या निकालापासून वंचित ठेवले ते दरमहा १२०००रू रोजंदारीवरच व कामावर ठेऊन त्यांना रोजंदारीचा कामाचा मोबदला. आणि प्रत्यक्षात मात्र प्रत्यक्ष ते काम करीत असताना वेतन मात्र दुसऱ्याच्या नावाने निघावा असाही डाव खेळला असल्याचां आरोपही त्यांनी केला. या न्याय मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर १४ऑगस्ट पासून आक्रोश धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला लाल बावटा शेतमजूर युनियन, वन कामगार युनियन नेते अमृत महाजन यांनी पाठिंबा दिला आहे.