मुंबई (वृत्तसंस्था );- आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.
उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा; निवडणूक आयोगाची विधानपरिषद निवडणुकीला परवानगी
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शुक्रवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठीच्या निवडणुकीला परवानगी दिली. त्यामुळे आता यापैकी एका जागेवर निवडणूक लढवून उद्धव ठाकरे आमदार म्हणून विधानपरिषदेवर निवडून जाऊ शकतात. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ मे पूर्वी या निवडणुका व्हाव्यात, असे निर्देश दिले आहेत. मात्र, ही निवडणूक घेत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरनाबाबतच्या इतर सगळी काळजी घेणे बंधनकारक असेल.
आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाली होती. तर काल शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनीही राज्यपालांची भेट घेतली होती. हा सगळा घटनाक्रम पाहता उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा तिढा सुटेल, असे संकेत मिळत होते. अखेर ही शक्यता खरी ठरली.