धरणगाव तालुक्यातील श्री क्षेत्र रामेश्वर येथील घटना
धरणगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात दुदैवी घटना सोमवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. एका कुटुंबातील तीन तरुण नदीत बुडून मृत्युमुखी पडले आहे. यातील दोन जणांचे मृतदेह काढण्यात आला असून तिसऱ्याचा शोध घेणे सुरू आहे. घटनास्थळी जळगाव तालुका पोलीस प्रशासन आणि धुळे येथील एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.
सागर अनिल शिंपी, अक्षय शिंपी आणि पियुष रवि शिंपी तिन्ही रा. एरंडोल अशी बुडालेल्या तीनही मुलांची नावे आहेत. हे तीनही मुलं एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे. श्रावण सोमवार निमित्त जिल्ह्यातील महादेव मंदीरात विविध कार्यक्रम साजरे होत आहे. अनेक भाविक भक्त कावड यात्रेचे आयोजन करून महादेव मंदीरावर दर्शनासाठी जात आहे. या अनुषंगाने एरंडोल शहरातील भगवा चौकातील काही तरूण हे सोमवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजता वाहनातून जळगाव तालुक्यातील गिरणा, तापी आणि अंजनी नदीचा एकत्रित त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदीरावर दर्शनासाठी गेले.
सोमवार दि. २१ रोजी दुपारी साडेतीन वाजता पोहण्यासाठी गेलेले पियुष रवि शिंपी, सागर अनिल शिंपी आणि अक्षय शिंपी हे तिघे पाण्यात बुडाल्याची घटना घडली. पट्टीचे पोहणाऱ्या तरूणांकडून बुडालेल्याचा शोध घेणे सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.