जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात एका तरुणाने राहत्या घरी मध्यरात्री ११ वाजता छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कौतिक सुकलाल साळुंखे (वय ३८, मूळ रा. किनगाव, ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. मिस्त्री काम करून परिवाराचा ते उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले असा परिवार आहे.(केसीएन)त्यांच्या आई वडील यावल तालुक्यातील किनगाव येथे राहतात. कौतिक साळुंखे हे रात्री जेवण झाल्यानंतर कुटुंबासोबत झोपले होते. याच वेळी त्यांनी गळफास घेतला. काही वेळाने त्यांच्या पत्नीच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी एकच हंबरडा फोडला.
घरात साळुंखे दांपत्यासह त्यांची तीन लहान मुलेही होती. त्यांचा आवाज ऐकून शेजारी तात्काळ धावून आले. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तातडीने कौतिक साळुंखे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. कौतिक साळुंखे यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.