काय आहेत नवीन नियम जाणून घ्या … !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- सरकारी संस्था टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया ( TRAI ) मोबाईल नेटवर्क संदर्भात नवीन नियम आणले असून ते येत्या 1 सप्टेंबर 2024 पासून देशभर लागू होणार आहेत.
हे नियम लागू झाल्यानंतर अन वॉण्टेड कॉलपासून सर्वसामान्य ग्राहकांची सुटका होणार आहे. या संदर्भात सूचना ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना देखील पाठविलेल्या आहेत.
जर तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकावरुन टेलिमार्केटिंग केले तर तुमचा मोबाईल क्रमांक दोन वर्षांसाठी ब्लॅक लिस्ट केला जाणार आहे. कारण आता टेलिमार्केटिंग करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम मंत्रालयाने नवीन मोबाईल नंबर सिरीज जारी केलेली आहे. टेलिकॉम कम्युनिकेशन विभागाने नवीन 160 नंबर सिरीज फायनान्शिय फ्रॉड रोखण्यासाठी जारी केली आहे. त्यामुळे या स्थितीत आता बँकींग सेक्टर आणि इन्शुरन्स सेक्टर याच 160 क्रमांकाच्या मोबाईल क्रमांकाच्या सिरीजवरुन त्यांचे प्रमोशनल कॉल किंवा मॅसेज ग्राहकांना करु किंवा पाठवू शकणार आहेत.
अशा प्रकारचे कॉल आणि मॅसेजना बंदी
नवीन नियम लागू झाल्यानंतर नवीन नियम लागू झाल्यानंतर अन वॉण्टेड कॉल्स आणि मेसेजच्या समस्येपासून सुटका होऊ शकेल,असे मानले जात आहे. कारण नवीन नियमाप्रमाणे आपोआप तयार होणारे कॉल्स आणि मेसेज देखील समाविष्ट केलेले आहेत, ज्या कॉलना रोबोटिक कॉल आणि मॅसेज देखील म्हणतात. येत्या 1 सप्टेंबरपासून अशा सर्व कॉल्स आणि मेसेजवर बंदी घालण्यात येईल असे सरकारने म्हटले आहे.