माजी सरपंचाच्या सहकार्याने खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया पार
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यात शिरसोली प्र. बो. गावाची सरपंचपदाची निवड शुक्रवारी दि. २७ जून रोजी उत्साहात पार पडली. सरपंचपदी शिवसेनेचे नितीन अर्जुन बुंधे या तरुण तडफदार युवा नेतृत्वाची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. तर माजी सरपंच उषा अर्जुन पवार यांनी देखील सहकार्य केल्याने निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
शिरसोली प्र.बो. गावातील सरपंच .उषा पवार यांनी जात वैधता प्रमाणपत्र हे बनावट आणल्याप्रकरणी त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले होते.काही दिवसांपासून सरपंच हे पद रिक्त होते. येथे १७ पैकी ३ सदस्य अपात्र झाले आहे. प्रभार उपसरपंच डिगंबर रामकृष्ण बारी यांच्याकडे होता. शुक्रवारी दि. २७ रोजी सकाळी सरपंचपदासाठी एकूण ४ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यात नितीन अर्जुन बुंधे, प्रवीण अशोक बारी, भारती सुनील पाटील, आशाबाई सुरेश बारी यांनी आपला अर्ज अध्यासीन अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यानंतर दुपारी २ वाजता यातील नितीन बुंधे वगळता इतर तिघांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे नितीन बुंधे यांचा एकमेव अर्ज राहिला. अखेर सर्व १४ सदस्यांच्या सहकार्याने निवडणूक हि बिनविरोध पार पडली.
यासाठी माजी सरपंच उषा अर्जुन पवार व त्याचे पती अर्जुन पवार यांचेसह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांचे अनमोल सहकार्य लाभले. निवडणुकीकरिता अध्यासीन अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी सारिका दुरगुडे यांनी काम पाहिले. त्याना सहाय्य अधिकारी अजिंक्य आंधळे, तलाठी अनघा घाडगे, ग्रामविकास अधिकारी डी.जे.पाटे , ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच डिगंबर रामकृष्ण बारी, सदस्य प्रदीप रावसाहेब पाटील, रईस शे.इलियास, अबुबकर शकील खाटिक, आशाबाई मुरलीधर ढेंगळे, सीमा प्रवीण पाटील, भारती सुनील पाटील, प्रवीण अशोक बारी, उषा अर्जुन पवार ,आशाबाई सुरेश बारी, शीतल राजेंद्र खलसे, श्रद्धा प्रशांत काटोले, फौजीया शोएब खाटीक उपस्थित होते. नितीन बुंधे सरपंच व्हावे यासाठी आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्न केला. यामुळे पहिल्यांदा ही निवडणूक शांततेत पार पडली. नितीन बुंधे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.