जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अनेक ठिकाणचे अतिक्रमित व बंद झालेले पाणंद रस्ते तसेच शेतशिवारातील वहिवाटीचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी जामनेर तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिले आहे.
तालुक्यातील तोरनाळे, पठाड तांडा, वसंतनगर, देऊळगाव गुजरी, जळांद्री बुद्रुक यासह अनेक गावांना या समस्या आहेत, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी, शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांची समस्या बांधावर जाऊन सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी नंदकिशोर पाटील, विठ्ठल वारुळ, राजू पाटील, ज्ञानेश्वर बोंडारे, विनोद पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.