जळगाव तालुक्यातील असोदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा शिवारात शेतात काम करीत असणाऱ्या शेतकऱ्यांवर अचानक मधमाशांच्या मोठ्या थव्याने हल्ला केला. या घटनेत ५ शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आसोदा शिवारातील शेतकरी, शेतमजूर शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. त्या वेळी एका झाडावर मधमाशांचे मोठे पोळे होते. अचानक मधमाशांचा थवा चिडून बाहेर पडला आणि शेतकर्यांवर थेट हल्ला चढविला.(केसीएन)शेतकर्यांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली, मात्र मधमाशांनी त्यांचा पाठलाग करत दंश केला. मधमाशांच्या हल्ल्यात ५ शेतकरी जखमी झाले असून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात शोभा नारायण झोपे (वय ६५), भागवत ज्ञानदेव खाचणे (वय ५४), सारिका रुपेश भंगाळे (वय २७), रेखा प्रेमचंद अत्तरदे (वय ७०), रुपेश सुधाकर भंगाळे (वय २७) हे जखमी झाले आहे.