धरणगाव तालुक्यातील पोखरीतांडा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव तालुक्यातील पोखरीतांडा येथे सुखीसंपन्न कुटुंबातील शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा लहान मुलगा घरी आला, त्यावेळी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
कैलास देविदास राठोड (वय् ४६, रा. पोखरीतांडा ता. धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची स्वतःची शेती आहे. शेतीकाम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले असा परिवार आहे. गुरुवारी दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी घरी कोणी नसताना कैलास राठोड यांनी राहत्या घरी गळफास घेतला. त्यांचा लहान मुलगा महाविद्यालयातून घरी आला, त्यावेळी त्याला हि घटना समजली.
त्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांना माहिती दिली. कैलास राठोड यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळूंखे यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.