जिल्हास्तरीय समितीचा निर्णय
जळगाव (प्रतिनिधी) :- शेतकरी आत्महत्यांच्या ६ प्रस्तावांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. महिन्यातून दोनदा बैठक घेण्याचा निर्णय झाल्यानुसार या समितीने डिसेंबरमध्ये ११ प्रकरणांना मंजुरी दिली आहे.
सविता शरद पाटील (कोल्हे, ता. पाचोरा) मंगा चिंधा माळी (दहिवद ता. अमळनेर), भगवान राजमल पाटील (हनमंतखेडे, ता. एरंडोल), सुनील वामन पाटील (वाकडी, ता. जळगाव), सुनील तुकाराम गावंडे (सामरोद, ता. जामनेर) व जीवन ज्ञानेश्वर भागवत (लोनढरी, ता. जामनेर)) या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.