पालकमंत्री गुलाबराव पाटील : वसंतवाडी येथे पाझर तलाव जलपूजन
जळगाव (प्रतिनिधी) : पाझर तलावामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. याशिवाय विहिरींच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढली असून उन्हाळ्यात देखील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. याचा थेट फायदा शेतकरी आणि ग्रामस्थांना होईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिपादन केले.


मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वसंतवाडी (जळके तांडा) पाझर तलावातील जलपूजन शनिवारी करण्यात आले. मागील वर्षी या तलावाच्या दुरुस्तीकरिता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ४० लाख रुपये निधी मंजूर केला होता. त्याचा प्रत्यक्ष परिणाम यंदा दिसून आला असून पाझर तलाव शंभर टक्के भरून गेला आहे. २६ एकर सिंचन क्षमता असलेल्या या पात्र तलावात तब्बल १२० डीसीएम पाणी साठवले गेले आहे. तसेच तालुक्यांतील लोणवाडी, विटनेर तांडा व वराड येथिल पाझर तलाव पूर्णपणे भरल्यामुळे तेथील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपअभियंता अविनाश पारधी यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखा अभियंता किरण बोरसे यांनी मानले. यावेळी सिंचनाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सरिताताई माळी-कोल्हे, दूध संघाचे संचालक रमेश पाटील, उपजिल्हाप्रमुख रवी कापडणे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, जितेंद्र पाटील, वसंतवाडीचे सरपंच विनोद पाटील, उपसरपंच वंदनाताई सूर्यवंशी, सिंचनचे उपअभियंता अविनाश पारधी, शाखा अभियंता किरण बोरसे, ठेकेदार नितीन महाजन, ग्रा.पं. सदस्य अनिताताई चिमणकारे, सुशीलाबाई ठोसर, निवृत्ती पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष दीपक पाटील, प्रवीण पाटील, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल पाटील, सोपान सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









