जळगाव ( प्रतिनिधी ) – सशक्त मानसिकतेसाठी संत राजिन्दरसिंह यांनी आपल्या साधकांना आणि तमाम जनतेला योग व ध्यानाभ्यासाचे आवाहन केले आहे.
दरवर्षी 10 ऑक्टोबरला विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस साजरा केला जातो. सध्याच्या काळात बरेच लोक त्रस्त आणि तणावामुळे दहशत, उदासीनता आणि भीतीचा सामना करीत आहेत. काही लोकांची आर्थिक-तंगी, काही जणांना एकटेपण आणि बऱ्याच लोकांना जीवनात आशेचा किरण नजरेस येत नाही.

वैज्ञानिक संशोधनाने प्रमाणित केलेले आहे की मनुष्याचा मेंदू आणि शरीर यांचा परस्पर संबंध आहे. बिघडलेली मानसिक अवस्था ब्लडप्रेशर वाढणे, पाचनक्रिया बिघडणे, डोकेदुखी, हृदयरोग, श्वासाचे रोग, मासं-पेशीची पीडा, त्वचेवर फोड अशा अनेक आजारांना जन्म देते, जसे काही वर्षांपासून तणाव नष्ट करण्याकरिता लोकांचा कल ध्यान-अभ्यासाकडे वळलेला आहे. ध्यान-अभ्यासाचे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. ध्यानाभ्यासाने शारीरिक दृष्ट्या आपण शांत होतो, प्रभू प्रेम आणि परम सुखामध्ये आपण डुबकी मारू शकतो.ध्यानाभ्यासाच्या वेळी मेंदुच्या तरंगांची गती 5 ते 8 प्रति सेकंद असते. साधारणतः जागृत अवस्थेत तरंगांची गती यापेक्षा दुप्पट अथवा तिप्पट असते. आपण ध्यानाभ्यास करतो तेव्हा मानसिक आणि शारीरिक विश्रामाव्यतिरिक्त तणाव कमी झाल्याने सभोवतालच्या लोकांवर त्याचा चांगला परिणाम होतो.







