जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव, गोदावरीच्या मृगस्वरांनी रसिक चिंब… कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गरज आज मेधा’, ‘आऊ तोरे चरण कमल मितांना मन प्रसन करणारे त्यहार्मोनियम आणि तबलावादनाची सुरेल जोड मिळाल्याने उत्तरोत्तम बहरत गेला, गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने दि. 15 जून 2025 रोजी सायं 5.30 वा कार्यक्रमाचे आयोजन गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फउंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती गोदावरीआई पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकीताई पाटील उपस्थित होते. गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. पथजा नेवे, कथक विभाग प्रमुख डॉ. महिमा मिश्रा, श्री. प्रविण महाजन, श्री. देवेंद्र गुरव, श्री. सुशिल महाजन, केंद्र व्यवस्थापक श्री. राजु पाटील व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गायन विभागाचे राग भुपाली मध्ये सरगम गीत व छोटा ख्याल हे तुलसी महाजन, अथर्व पाटील, वीरा चौधरी, वैदेही राजपूत, धनश्री जोशी, डेलीना अत्तरदे यांनी सादर केले, तसेच ‘ज्योती कलश छलके’ हे गीत नाजनीन शेख यांनी सादर केले, तर ‘आऊ तोरे चरण कमल’ हे गीत निकीता जोशी तर देहाची तिजोरी’ हे भक्ती गीत सौ. अलका खैरनार, सौ. राजश्री पाठक, सौ. मनिषा डेकाटे यांनी सादर केले, ‘माझे माहेर पंढरी’ हा सुरेल असा अभंग ऋतुराज जोशी यांनी सादर केले. ‘गरज गरज आज मेघा’ या गीतावर कथक विभागातील रीया वर्मा, समृध्दी जोशी, लावण्या डहाड यांनी बहारदार असे नृत्य सादर केले, तर तबला विभागाच्या कृणाल गजाकुश व सार्थक महाजन यांनी त्रिताल तबला वादनातील तालातील प्रकार सादर केले. तर गायन विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘पंख होते तो उड आती रे’, ‘सायो नारा सायो नारा’, ‘चंदा है तु मेरा सुरज है तु’, ‘दिल दिवाना बीन सजना के, हे गीत अनुक्रमे समिक्षा माकोडे, अर्चना गजाकुश, हिमानी सोनार यांनी सोलो गीत सादर केले. तर ‘ॐ नमः शिवाय’ हे गीत समिक्षा माकोडे, नाजनीन शेख, ऋतुराज जोशी यांनी सादर केले. तसेच कार्यक्रमाची सांगता ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत गायन विभागातील सर्व विद्याथ्यर्थ्यांनी सामुहीक आपल्या मधुर आवाजात सादर केले. कार्यक्रमास साथसंगत म्हणून तबला ढोलक श्री. प्रविण महाजन, ऑक्टोपॅड श्री. देवेंद्र गुरव तर सिन्थेसायझर वर श्री. सुशिल महाजन यांनी केली. डॉ. महिमा मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले तर सौ. संध्या फासे यांनी कार्यक्रमाचे सुरेल असे सुत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन श्री. भुषण खैरनार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक श्री. राजू पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी, ईश्वर पाटील यांनी सहकार्य केले.