रिपाइंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
जळगाव (प्रतिनिधी ) ;- शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित ऑफलाईन वाटपाची परवानगी रेशन दुकानदारांना देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, शासनाने स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्याकरीता संपूर्ण महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशिन दिल्या. आणि प्रत्येक शिधापत्रिका धारकांना बायोमॅट्रीक नुसारच धान्य वितरण करण्यात येईल अशी सक्ती केली. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानास ऑनलाईन नुसार धान्य वाटप केले जात आहे. मात्र सरकारने ४G नविन मशिन दिले. मात्र सर्व्हर क्षमता कमी पडत असल्याने वारंवार ई-पॉज मशिन बंद पडून परणामी लाभार्थी धान्यविना परत जात आहेत. गेल्या पाच दिवसांपासून धान्य वाटप करतांना सर्व्हरचा मोठा प्राब्लेम शहरात तसेच ग्रामिण भागातील रेशन दुकानात निर्माण झाल्याने धान्य दुकानात पडून आहे. सर्वसामान्य शिधापत्रिकाधारक हा पाच किलो धान्य घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहत आहे. मात्र रेशन दुकानदार सर्व्हरमुळे संबंधित कार्डधारकाला धान्य देऊ शकत नाही अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे.
सध्या ग्रामिण भागात शेतीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे तसेच शहरी भागात सुद्धा मोठ्या संख्येने मजूर काम करणारे असल्याने तसेच गेल्या चार ते पाच दिवसापासून जिल्हयात पाऊस सुरू आहे अशा परिस्थिती मध्ये रेशनकार्ड हे धान्य न मिळाल्याने वापस जात आहेत. तरी शासनाने शिधापत्रिकांना ऑफलाईन धान्य वितरण करण्याचे आदेश स्वस्त धान्य दुकानदारांना द्यावे. तसेच धान्य वितरणास १५ ऑगस्ट पर्यंत वाढीव मुदतवाढ देण्यात यावी जेणेकरून कोणत्याही शिधापत्रिका धारक हा अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, निवेदन देतेवेळी जिल्हा सचिव भरत मोरे, प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, गौतम सरदार, नरेंद्र मोरे, किरण अडकमोल, विकी हिजोडे, आदी कायकर्ते उपस्थित होते.