औरंगाबाद (वृत्तसंस्था ) – राज्यात 5 हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करु, 8 हजार प्राध्यापकांची भरती 7 महिन्यात पूर्ण केली जाईल. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून हे प्राध्यापक रुजू होतील, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे . विद्यापीठ व महाविद्यालयांना पत्र पाठवून अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करण्यासाठी सूचना करेल, असं आश्वासनही सामंत यांनी दिलं

राज्यातील प्राध्यापक भरती लवकर सुरु करावी अशी मागणी कित्येक महिन्यांपासून केली जात आहे. पुणे, मुंबई तसेच इतर जिल्ह्यांत आंदोलनदेखील करण्यात आले आता राज्य सरकारने प्राध्यापक भरतीबाबत महत्वनाचा निर्णय घेतला आहे दोन दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे महत्वाची माहिती दिली होती. राज्यात पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं होतं.
राज्यात अकरा वर्षांपासून प्राध्यापक भरती नियमितपणे झालेली नाही. महाविद्यालयातील पन्नास टक्के जागा रिक्त असल्यानं शिक्षणावर परिणाम होत आहे. सेट नेट परीक्षांचं आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. आता मात्र उशिराने का होईना पण प्राध्यापक भरतीला मान्यता मिळालेली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.







