गुलाबरावांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश


जळगाव (प्रतिनिधी) – आपण या सहा महिन्यांच्या काळात केलेले काम हे भरभरून आहे. जिल्ह्यातील माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या काळात चार सिलेंडर होती, ती आता चारशे सेंटर आहेत. कुठे गेली जीएम फाऊंडेशनचे अंबुलन्स ? कुठे आहेत आरोग्यदूत ? असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या बैठकीत गिरीश महाजन यांच्यावर तोंडसुख घेतले. कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेऊन आपली जनतेसाठी केलेली चांगली कामे ओरडून सांगावी, रडुबाई रडू , कोपऱ्यात बसू असले वागणे आता कार्यकर्त्यांनी सोडावे असा घणाघात करीत गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
शहरात शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय राऊत दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी दुपारी एक वाजता त्यांनी महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, जळगावात खड्डे पडले. ते खड्डे लगेच दुरुस्त होणार नाही. मात्र त्यासाठी लागणारा पाठपुरावा चालू ठेवला पाहिजे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या काळामध्ये आपण खड्डेमुक्त जळगावसाठी काय काम केले हे आपण बोललं पाहिजे. त्याशिवाय आपण महापालिकेतील 16 विरोधी नगरसेवकांची काय ताकद राहील ? असेही त्यांनी सुनावले. कोरोना काळामध्ये पालकमंत्री म्हणून आपण जे काम केले ते मागील कित्येक वर्षे झाली नाही. आज जळगाव शासकीय महाविद्यालय हे उद्या राज्यात एक नंबरचे उत्तम सुविधा असलेले सरकारी हॉस्पिटल असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांना कार्य करण्याची गरज आहे. अडचणी आल्या तर टेन्शन घेता कशाला ? मला विचारा, मी मार्गदर्शन करतो. महापालिकेत भाजपचे 57 नगरसेवक आहेत. आपले 15 असूनही आपण विरोधी पक्ष म्हणून भारी पडला पाहिजे. महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांची महिन्यातून एकदा यापुढे मीटिंग घेत जाईल, असेही बैठकीत सांगितले.







