धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव शहरातील हनुमान नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून कुटुंबातील सहा जणांना अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली तर घरावर दगडफेक केल्याचा प्रकार १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी रविवारी २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिपक रतन माळी (वाघ) रा. हनुमान नगर, धरणगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. अंडा पावची गाडी लावून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्याच्या गल्लीत राहणारा यज्ञेश दत्तात्रय पवार याने दिपक माळी यांच्या मुलीला शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दिपक माळी यांच्यासह मुलगी सृष्टी, मुलगा संघर्ष, भाऊ कैलास, वहिणी मंगलाबाई आणि आई रमणबाई महाजन यांना यज्ञेश दत्तात्रय पवार यांच्यासह त्याचे नातेवाईकांनी अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. तर इतरांना दिपक माळी यांच्या घरावर दगडफेक केली. या मारहाणीत व दगडफेकीत संघर्ष महाजन आणि रमणबाई महाजन हे जखमी झाले आहे.