नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – जगभरातील प्रदूषणाच्या स्थितीबाबत एक अहवाल जारी करण्यात आला असून, त्यात ही माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये दिल्ली आणि कोलकाता ही भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये दिल्लीसर्वोच्च पातळीवर असून पहिल्या क्रमांकावर आहे. कोलकाता 84 माइक्रोग्राम प्रति क्यूबिक मीटर दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर नायजेरियातील कानो शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दिल्लीतील वायू प्रदुषणाची पातळी वाढली
यूएस-आधारित संशोधन संस्था हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट (HEI) च्या स्टेट ऑफ ग्लोबल एअर इनिशिएटिव्हच्या अभ्यासानुसार, 2019 मध्ये दिल्ली आणि कोलकाता येथे प्रदूषणामुळे 1 लाख लोकसंख्येमागे 106 आणि 99 मृत्यूची नोंद झाली. म्हणजेच पीएम 2.5 ची पातळी वाढल्याने हे मृत्यू झाले आहेत. 2019 मध्ये, दिल्लीतील पीएम 2.5 पातळी प्रति घनमीटर 110 मायक्रोग्रॅम होती, जी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सर्वाधिक आहे.