भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहराजवळच्या तापी नदीच्या पात्रात पती – पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. पोलिसांना पती-पत्नीने आत्महत्या केल्याचा संशय आहे. या संदर्भात भुसावळच्या शहर पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.
भुसावळ शहराच्या जवळून वाहणार्या तापी नदीच्या पात्रात दोन मृतदेह तरंगतांना आढळून आले. सायंकाळी उशीरापर्यंत त्यांची ओळख पटली. हे दोन्ही मृतदेह वसंत नेमाडे (वय ६५) आणि मालतीबाई वसंत नेमाडे ( वय ५६) या पती-पत्नीची असल्याची ओळख पटली. त्यांनी तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन स्वत:चे जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे.
आदल्या दिवशी म्हणजे रविवारी त्यांनी नदी पात्रात उडी घेतल्याची शक्यता असून सोमवारी मृतदेह आढळून आल्याने शहर जावून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. त्यांनी बामणोद येथून दुचाकी गाठून तापी नदीवरून उडी घेतल्याचे समोर आले आहे.
नेमाडे दाम्पत्याने नेमकी कशासाठी आत्महत्या केली याचे कारण समजले नाही. तथापि, आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे मानले जात आहे.