पारोळा (प्रतिनिधी) – ३८० वर्षापासून बालाजी संस्थानाची वाहन व रथोत्सवा ची जुनी परंपरा आहे दरवर्षी ब्रह्मोउत्सवाच्या (नवरात्रोत्सव) दरम्यान मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा केला जातो. पण कोरोनाच्या संकटात वहन व रथोत्सव रद्द झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. या कोरोनाच्या संकटात ३८० वर्षा पासून सुरू असलेली ही परंपरा पहिल्यांदा खंडित होत असल्याची माहिती विश्वस्त माजी खासदार ए.टी.पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
३८० वर्षांपासून सुरू असलेली धार्मिक परंपरा पूजाविधी अभिषेक हे मात्र घरगुती वातावरणात व विश्वस्त मंडळ व मोजके सेवेकरी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर व कोरोनाचे नियम पाळून करण्यात येतील अशी माहिती संस्थानाचे मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बालाजी संस्थांनाकडून दरवर्षी ब्रह्मोउत्सवात लाकडी चारचाकी गाडी सजवून त्यावर श्री बालाजी महाराजांची मूर्ती विराजमान करून मिरवणूक काढण्यात येत असे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रथोत्सव काढण्यात येत. लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय या नामघोषात एक ते सव्वा लाख भाविकांच्या उपस्थितीत रथ मिरवणूक निघत असे.
पण यावर्षी कोरोनाच्या पादुर्भावाने हे मिरवणूक, रथोत्सव हे रद्द झाले आहे.त्यामुळे भाविक हे सर्व कार्यक्रमांना मुकणार आहे. पण घरगुती वातावरणात जे धार्मिक पूजाविधी होणार आहे. ते व श्री बालाजी महाराजांचे दर्शन हे कार्यक्रम लाईव्ह दाखवून ते भक्तांना घर बसल्या टी.व्ही. वर पाहण्यास मिळणार आहे. अशी माहिती विश्वस्त ए. टी. पाटील यांनी पत्रकारांना दिली.
महाप्रसादाची परंपरा खंडित होऊ नये. म्हणून शहरात घरोघरी लाडू प्रसाद वाटप केली जाणार आहे. प्रसाद मिळाल्यावर भाविकांनी मंदिराला यथाशक्ती आर्थिक मदतीचे ही आहवान विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले.
पारोळ्यात बालाजी मंदिराची यात्रा म्हणजे २ ते ३ कोटी रुपयांची उलाढाल ही होत असते. पण यंदा सर्वच कार्यक्रम रद्द झाल्याने व्यापारी व व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
या पत्रकार परिषदेच्या वेळी महाप्रसाद समितीचे अध्यक्ष माजी खासदार ए. टी. पाटील संस्थानाचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी ,कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले ,विश्वस्त केशव क्षत्रिय ,अरुण वाणी ,संजय कासार ,दिनेश गुजराथी ,डॉ अनिल गुजराथी ,प्रकाश शिंपी ,आदी जण उपस्थित होते.