जळगाव (प्रतिनिधी) : – जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमिकरणाला प्राथमिकता देण्यात आली असून इमारत, वाहने इत्यादीसाठी जिल्हा वार्षिक नियोजनमधून २८ कोटी एवढा निधी देण्यात आला आहे. त्यातून पाळधी व रामानंदनगर येथील नविन पोलीस स्टेशन इमारत बांधकामाचे भूमिपूजन दि. ६ मार्च रोजी झाले.
यावेळी यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दतात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, जळगाव अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते , धरणगाव पोलीस निरीक्षक उमेश डमाळे, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिरसाठ, प्रताप पाटील, सा.बा.चे कार्यकारी अभियंता गिरीश सूर्यवंशी, राजू परदेशी, प्रांजळ पाटील, उप अभियंता एस.डी. पाटील, योगेश अहिरे, पाळधी बु. चे सरपंच विजय सिंग पाटील, उपसरपंच राहुल ठाकरे, पाळधी खु. चे सरपंच लक्ष्मीबाई कोळी, उपसरपंच भारती पाटील, सरीताताई कोल्हे माळी, आशुतोष पाटील, ग्राम विकास अधिकारी सचिन पवार , संजय पाटील आदि उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे जनतेच्या सुरक्षितता पुरविण्याची, ते कर्तव्य आम्ही करत आहोत. पोलीस बळकटीकरणासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी जिल्हा वार्षिक नियोजनामधून निधी मिळवून दिल्या बद्दल गौरवपूर्ण उल्लेख करून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दतात्रय कराळे यांनी गुन्हेगारी थांबविण्यासाठी जनतेला सहकार्याचे आवाहन केले. या दोन्ही पोलीस स्टेशनच्या इमारती एका वर्षात पूर्ण करून अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
आज एस. आर. पी. एफ चा वर्धापन दिन असून बरोबर ७६ वर्षापूर्वी आजच्या दिवशीच स्थापन झाली होती. आज तो योग गाठून दोन्ही पोलीस स्टेशनच्या इमारतीचे भूमीपूजन होत असल्याचे सांगून पोलीस स्टेशन हे सर्वसामान्यांच्या संरक्षणाचे ठिकाण आहे, घाबरण्याचे नाही. त्यामुळे नागरिकांनी गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांना मदत करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार यांनी केले. प्रास्ताविकात पोलीस उपअधिक्षक सुनील नंदवाडकर यांनी नवीन पोलीस स्टेशन बांधकाम बाबत सविस्तर महिती विषद केली. तर आभार पोलीस निरीक्षक उमेश डमाळे यांनी मानले.