जळगाव ( प्रतिनिधी ) – केंद्र सरकारच्या जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जयपूर येथील भारती विकास संस्थेतर्फे मनोज दीक्षित व श्रीमती मोनिका जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे (भूसंपादन), कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते (रोहयो), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे (ग्रामपंचायत), भूमीअभिलेख विभागाचे अधीक्षक मगर, तहसीलदार जितेंद्र कुवर, बोदवड, चोपडा, पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा नियोजन कार्यालयातील लेखाधिकारी कैलास सोनार आदी उपस्थित होते.
दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील समिती 20 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील दहा गावांना भेटी देवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान, एनएसईपी, आजिविका, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, भूमीअभिलेख, संसद आदर्श ग्राम योजना आदी योजनांचा आढावा घेतील. लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.







