मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना संकटात साखर कारखान्यांच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले. यानंतर भाजप नेते निलेश राणे आणि आमदार रोहित पवार यांच्या ट्वीट युद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे. हे दोघेही एकमेंकावर ट्वीटरवरुन टीका करत आहेत. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? असा प्रश्न उपस्थित करत मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्यासारखी तुझी हालत होईल असा टोला निलेश राणेंनी रोहित पवारांना लगावला.
यानंतर रोहित पवारांनी यात उडी घेत निलेश राणेंना टोला लगावला होता. साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ आणि इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी असे रोहित पवार म्हणाले.