नांदेड (प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एका १७ वर्षाच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तराफे वाचवण्याच्या नादात या तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला. राजू चव्हाण असे मयत तरुणाचे नाव आहे. हि घटना हदगावच्या उंचाडा येथील कयादू नदीत घडली. वाळू काढण्यासाठी लागणाऱ्या तराफ्यांवर कारवाई केली जाईल, या भीतीने राजू ते वाचवण्यासाठी नदीत उतरला होता. तराफे लपवण्यासाठी पोहत जात असताना राजूचा पाय अडकला आणि तो बुडाला. या घटनेनं सध्या हदगाव तालुक्यात खळबळ माजली असून कयादू नदीतील अवैध वाळू उपशाचा प्रश्नदेखील पुन्हा ऐरणीवर आला आहे.