सभेत आलेल्या जनतेत संभ्रम, योजनांची माहिती मिळेल तरी कशी ?
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात राज्य शासनाचा “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर मंगळवारी २७ जून रोजी घेण्यात आला. कार्यक्रमांमध्ये भाजपच्या व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मात्र शासनाच्या योजनाविषयी कमी आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्यात जास्त सुख मानले. यामुळे कार्यक्रम शासकीय होता की राजकीय ? कार्यक्रमात राजकारण आणण्याची काय गरज ? असे प्रश्न निर्माण होऊन जनतेत संभ्रम निर्माण झाला होता.
https://youtube.com/live/rzoUm2Zcxs0?feature=share7
“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात आले होते. कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भाषणे झाली. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शरसंधान साधताना सांगितले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वाल्याहो, तुमचाही पगार आम्ही चालू करून टाकू. काळे झेंडे कशे दाखवायचे हे शिकून घ्या. ते आमचे काम आहे. झेंडे कसे दाखवायचे ते तरी माहित आहे काय या भाषेत त्यांनी आरोप केले.
गिरीश महाजन यांनी सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर, आपले लाडके माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर काय वेळ आली आहे गुलाबभाऊ ? राष्ट्रवादीच्या ओट्यावर उभे राहून झेंडे दाखवावे लागत आहेत. या ना रस्त्यावर, ओट्यावर काय उभे राहता ? का पक्ष सोडायची वेळ आली ? अशा भाषेत एकनाथराव खडसे यांच्यावर टीका केली. आम्हाला काळे झेंडे दाखवत आहेत, भोसरीच्या प्रकल्पात तुम्ही तोंड काळे केले नसते तर तुम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती असे सांगून जिल्ह्यात तुमचे काही राहिले नाही असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
आमचं सरकार फेसबुक लाईव्ह सरकार नाही तर जनतेत जाणारे सरकार आहे अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले. तर, काही लोक काळे झेंडे दाखविताहेत. त्यांना माझा एकच सल्ला आहे की, या वयात तरी काळे कामं करणे सोडा असे फडणवीस यांनी आ. खडसेंविषयी नामोल्लेख टाळून म्हणाले.