पारोळा ( प्रतिनिधी ) – शहर व ग्रामीण भागातील रस्त्याची ऐन पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था होऊन नागरिकांचे हाल होत आहेत , अपघातांच्या भीतीने लोक जिव मुठीत धरुन रस्त्याने वापरतात आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पारोळा नगरपालिकेचे कॉलनी परिसरातील रस्ते, नळ पाईप लाईन, घंटागाडी नियमित सुरु करणेबाबत निवेदन मुख्याधिकारी ज्योती भगत यांना देण्यात आले.
काही महिन्यापासून नगरपालिका पारोळा हद्दीतील काही भागात घटागाडी नियमित येत नसून प्रभागातील कचरा व्यवस्थापन होत नाही कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे कॉलनी परिसरात नळ कनेक्शन नाही, नागरिकांचे हाल होत आहेत त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हे निवेदन देण्यात आले.भविष्यात नागरिकाना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो
या निवेदनाची दखल तात्काळ घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यचा इशारा मनसेकडून करण्यात आला आहे. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रज्वल चव्हाण , तालुकाध्यक्ष वसंत पवार, तालुका सचिव दीपक पाटील , दीपक पाटील ,शहर सचिव हर्षल वाघ , सागर पाटील मनसे विद्यार्थी सेनेचे शरद वाघ , प्रशांत मराठे , प्रशांत चौधरी, वाहतूक सेनेचे दादाभाउ पाटील, संजय पाटील , दिलीप चव्हाण , अविनाश पवार , मयूर वाघ आदी उपस्थित होते.