चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील निमगव्हाण शिवारात शेतातील वीज खांबावरील १२ गाळ्यांच्या अंतरावरील रोहित्रांना जोडणाऱ्या १ लाख ८२ हजार रुपये किंमतीच्या वीज तारांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमगव्हाण येथील शेतकरी राजेंद्र कस्तुरलाल भाटीया यांच्या निमगव्हाण शिवारातील गट क्रमांक-७४ या शेतात पाणी पुरवठा करणाऱ्या शेती पंपाच्या रोहित्रांला जोडणाऱ्या वीज खांबा वरील ७२० मीटर अंतरावरील चार गाळ्यांच्या लघुवाहिनीच्या वीज तारांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने शेतकरी राजेंद्र भाटीया यांनी निमगव्हाण भागाचे महावितरणचे कनिष्ठ अभियंता खेमचंद धांडे यांना भ्रमणध्वनीवरून सांगितले. (केसीएन)तसेच वडिल कस्तुरलाल छगनलाल भाटीया यांचे नावे असलेल्या गट क्रमांक-२०१/०१ च्या शेतात रोडच्या पलीकडील रोहित्राच्या १०० केव्ही लघुदाब वाहिनीची ७२० मीटर लांबीचे चार गाळ्यांच्या वीज तारा चोरी झालेले दिसले.
तसेच मगन नामदेव पाटील यांचा गट क्रमांक-१०९/२, संजय जगन्नाथ पाटील यांचा गट क्रमांक १०९/३, देविदास काशिराम पाटील यांचा गट क्रमांक १८१/१, मंगल छन्नु पाटील यांचा गट क्रमांक ९१,(केसीएन) शिवराम यादव पाटील यांचा गट क्रमांक- ९६, त्रिवेणाबाई पौलाद पाटील यांचा गट क्रमांक ९६/४, पंडीत यादव पाटील यांचा गट क्रमांक ९६/१ येथे असलेल्या रोहित्राला जोडणाऱ्या १०० केव्ही लघुदाब वाहिनीची २२०० मीटर लांबीच्या बारा गाळ्यांच्या वीज तारा चोरी गेल्याचे देखील निदर्शनास आले.
शेती पंपाला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राच्या वीज तारांची चोरी झाल्याने महावितरणचे १ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ रामकिसन भगवान सानप (वय-२८) यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोहेकॉ. पल्लवी सुभाष वाणी यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. विश्वनाथ गायकवाड करीत आहेत.