नेपाळ बस दुर्घटनेबद्दल व्यक्त केले दुःख
जळगाव (प्रतिनिधी) नेपाळ देशामध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील मयत झालेल्या भाविकांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी लखपती दीदी संमेलन मेळ्यात केली. तर मयतांचे वारस व जखमीना केद्र व राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले

भुसावळ तालुक्यातील वरणगाव दर्यापूर तळवेल जळगाव येथील भाविक हे उत्तर प्रदेश तसेच नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेले होते. नेपाळ येथे पशुपतिनाथ यांच्या दर्शनासाठी काठमांडू येथे जात असताना त्यांची बस दरीत व नदीत कोसळून 25 भाविकांचा तसेच चालक आणि क्लिनर यांचा मृत्यू झाला होता दरम्यान या मोठ्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी रविवारच्या लखपती दीदी संमेलन मेळ्यात दुःख व्यक्त केले
तसेच मयत कुटुंबीयांच्या वारसांना जे सहकार्य लागेल ते देण्याची तयारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळीला घोषित केले. तसेच राज्य शासनाकडून मयत कुटुंबीयांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जळगाव पालकमंत्री गुलाबराव, आमदार राजुमामा भोळे,पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आजी माजी आमदार, अधिकारी उपस्थित आहेत.
