डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव — नवीन कृषि शैक्षणिक धोरणानुसार कृषीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकावर जास्त जास्त भर देण्यात आला आहे. त्याचीच अंमलबजावणी करण्यासाठी दीक्षा आरंभ कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्ष विद्याथ्याँची कृषी औद्योगिक सहल जळगाव येथील जैन कृषी उद्योग समूहात आयोजित करण्यात आली होती.
या वेळी जैन हिल्सचे गिरीश कुलकर्णी यांनी जैन हिल्स येथील सघन पद्धत लागवड व अति सघन पद्धत लागवड ( उच्च घनता आणि अति घनता लागवड प्रणाली) लागवडीतील आंबा, चिकू, केळी, डाळिंब अशा विविध फळपिकांच्या विविध जातींची सविस्तर माहिती दिली.या भेटीदरम्यान टिश्यू कल्चर उत्पादन, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स या केंद्रास भेट देत कृषीतील नवीन तंत्रज्ञानाचे विद्यार्थ्यांनी ओळख करून घेतली. टिशू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे कशाप्रकारे निरोगी रोप निर्मिती केली जाते, याविषयी डॉ. अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पद्धती समजावून सांगितले. सोबतच येणार्या काळामध्ये हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स या नवीन कृषि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भविष्यातील शेती बद्दल डॉ. संतोष पाटील सर यांनी माहिती दिली. एकाच ठिकाणीं पीकाच्या व फळ झाडांच्या वेगवेळ्या जातीचे प्रात्यक्षिक क्षेत्र बघितले.तसेच कांदा व आंबा काढणीनंतर काढणीपश्चात तंत्रज्ञानाद्वारे मूल्यवर्धन करण्याविषयी माहिती देण्यात आली. यासह विद्याथ्यांनी कृषीतील ठिबक व स्पिंकलर सिंचन पद्धतीचे मॉडेल समजून घेऊन कमीत कमी पाण्यात जास्त उत्पादन काढण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. जैन इरिगेशन येथे उत्पादित होणार्या विविध प्रकारच्या पाइप्स, ठिबक व स्प्रिंकलर निर्मिती आणि त्यांची कार्यप्रणाली समजून घेतली.या कृषि औद्योगिक सहलीला मार्गदर्शन प्राचार्य डॉ.शैलेश तायडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. नीलेश भा.सदार, प्रा. वैभव पाटील यांनी केले होते.