जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील लिधुर येथील तरुण शेतकरी भिमराव सखाराम कोळी वय ३४ यांनी स्वतःच्या शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सेामवार २३ रोजी संध्याकाळी घडली आहे.
लिधुर येथील तरुण शेतकरी भिमराव कोळी यांनी दिवसभर शेतात काम केल्यानंतर संध्याकाळी शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला ठिबक नळीने गळफास घेऊन आत्महत्या करुन जिवन यांत्रा संपवली. मृत्युचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस पाटील प्रमोद निंबा पाटील यांनी खबर दिल्यावरुन तालूका पेालिसांत या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तालूका पेालिस गुन्ह्याचा तपास करीत आहे.







