जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील प्रमुख भाजीपाला पिकांमध्ये केळी, भेंडी, टोमॅटो, लसून इत्यादी. पिकांचा समावेश आहे. परंतु स्थानिक बाजारपेठ व व्यापाऱ्यांच्या साखळीमुळे या पिकांच्या दरात/भावात मोठ्या प्रमाणात चढ-उतार असतात. केळी पिकास जून व जुलै 2022 या महिन्यांमध्ये प्रतिक्विंटल रुपये 2000 ते 2200 रुपये दर मिळत होते. परंतु सद्यःस्थितीत म्हणजेच ऑक्टोबर 2022 या महिन्यात केळी पिकास बोर्ड भावानुसार खरेदी न होता स्थानिक व्यापारी रू. 700 ते 800/- प्रति क्विं. एवढे दर देण्यात येत आहेत. जळगाव जिल्ह्यात मुख्यतः केळी पिकाची खरेदी ही स्थानिक व्यापारी त्यांच्या पद्धतीने करत असतात त्याला बोर्ड भावानुसार कधीही दर उपलब्ध होत नाही. केरळ सरकारने केळी, टोमॅटो,भेंडी,लसूण, बीटरूट इ. पिकांना लागू केलेल्या किमान अंतर्भूत मतीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने देखील या पद्धतीचे किमान आधारभूत किमती ठरवून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्वावा अशी आग्रही मागणी खासदार उन्मेशदादा पाटील केली आहे.
जळगाव जिल्ह्यात जून -जुलै 2022 या कालावधीत केळीचे दर अंदाजे रू.2000 ते 2200/- प्रति क्विं. याप्रमाणे होते. परंतु आज ऑगस्ट 2022 महिन्यात
शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी पाहता असे कळाले आहे की, केळी पिकाचे दर अचानक कोसळलेले असून शेतकऱ्यांना रू.800 ते 900/- प्रति क्वि.
दर मिळत आहे.
याबाबत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले असून केळी बोर्ड भाव प्रमाणे देखील स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी होत नसल्याने मोठी आर्थिक अडचण शेतकऱ्यांची झालेली आहे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.