तिकीट कापल्यामुळे समर्थक निराशच
लोकसभा सचिवालयाने जुलै २०२३ ला जाहीर केलेल्या माहितीनुसार विद्यमान आणि लोकसभेतील कामकाजामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांनी लक्षणीय सहभाग घेतला. अशा लोकसभेत तब्बल २७० खासदारांमध्ये उन्मेश पाटील यांनी लक्षवेधी कामगिरी नोंदवत दहावा क्रमांक पटकावला होता. याबाबतची विस्तृत माहिती लोकसभा सचिवालयाने जाहीर केलेल्या डेटाबेसमधून समोर आली होती. अशा टॉप टेन मधील असलेले खासदार उन्मेष पाटील हे मात्र भाजपा पक्षश्रेष्ठींच्या परीक्षेत (परीक्षणात) मात्र नापास झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नदीचा उत्सव साजरा करा असे आवाहन केले होते. त्याला अनुसरून खा. उन्मेश पाटील यांनी मतदारसंघातील गिरणा नदीची ४०० किलोमिटर पायी परिक्रमा केली. एखाद्या साधू संतांनी पायी परीक्रमा केल्याचे आपण पाहतो. माञ युवा खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्या सोबत युवक कार्यकर्त्यांना घेऊन ४०० किलोमीटर पायी परिक्रमा केली. नदी काठच्या गावात जनजागृती करीत ग्रामीण भागातील युवा शेतकरी, माता, बंधू-भगिनी जनतेशी खुला संवाद साधला. नदीचा उत्सव साजरा करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विचार खा. उन्मेष पाटील यांनी खेड्यापाड्यात पोहोचवला.
जळगाव लोकसभा मतदारसंघात युवाशक्तीला आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून खा. उन्मेश पाटील यांनी योजनांचा प्रचार व प्रसार करीत बँकेच्या अधिकाऱ्यांशी व अपेक्षित लाभार्थी युवकांचा समन्वय साधत बैठका घेतल्या. त्यांना कर्जाचा लाभ मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले. यातून एकट्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून ७५० युवा शेतकऱ्यांनी उद्योगाची उभारणी करून केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत केळी, लिंबू, मोसंबी, कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका इत्यादी पिकांचा पिक विमाधारक शेतकऱ्यांसाठी योग्य पाठपुरावा केला. विम्याची नुकसान भरपाईचा लाभ मिळवून देण्यात खासदार उन्मेश पाटील यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे.मतदार संघात त्यांनी स्वतःची “शेतकरी पिक विमा मिळवून देणारे खासदार” म्हणून ओळख निर्माण केली आहे.
शेतकऱ्यांना शेत तेथे ठिबक ही संकल्पना यशस्वीपणे राबवून पर ड्रॉप मोर क्रॉप याची अंमलबजावणी करुन जळगाव जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तुषार व ठींबक अनुदानाचा लाभ घेणारा जिल्हा ठरला आहे. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी पोकरा या योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील युवा शेतकरी,शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध घटकांचे लाभ देऊन महाराष्ट्रातील टॉप थ्री मध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश करून घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.उच्चशिक्षित आणि युवा खासदार मिळाला तर काय होऊ शकतो याचे उदाहरण द्यायचे ठरले तर आपल्या जळगाव जिल्ह्यात आपले विमानतळ हे गेल्या पाच वर्षांपूर्वी बंद अवस्थेत होते. यासाठी खा. उन्मेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करीत जळगाव विमानतळावर नाईट लँडिंग फॅसिलिटी सुविधा उपलब्ध करून दिली.
खा. उन्मेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करीत जळगाव विमानतळावर नाईट लँडिंग फॅसिलिटी सुविधा उपलब्ध करून दिली.देशातील सहा वैमानिक प्रशिक्षण केंद्रपैकी एक वैमानिक प्रशिक्षण केंद्र या जळगाव विमानतळावर मिळाल्याने जळगाव विमानतळ हे देशाच्या नकाशावर आले आहे. येथून लवकरच प्रधानमंत्री उडान योजने अंतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे.तसेच दळणवळणाच्या दृष्टिकोनातून जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक चार रेल्वे स्टेशनचा समावेश अमृत भारत स्टेशन मध्ये झाला.याकरीता खा. उन्मेश पाटील यांनी केलेला पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्हा हा सर्वच स्तरावर दळणवळणात आघाडीवर अग्रेसर ठरला आहे.