नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – महामार्गावर अनेक टोलनाके कार्यरत आहेत. फास्टटॅगसारख्या यंत्रणेच्या माध्यमातून टोल वसुली केली जात असली तरी भविष्यात सर्व टोलनाके हद्दपार होणार असून फक्त गाडीच्या नंबर प्लेटच्या आधारेच परस्पर टोलची रक्कम कपात होणार आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी नुकतेच अशा प्रकारचे संकेत दिले असून नजीकच्या कालावधीमध्ये ही यंत्रणा देशभरात सर्वत्र राबवण्यात येणार आहे. सध्या देशभरातील टोलनाक्यावर जी टोलवसुली केली जाते त्यासाठी 97% फास्टटॅग यंत्रणा वापरली जाते तरीही वाहतूक शंभर टक्के सुरळीत झालेली नाही म्हणूनच आता या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी वाहनांवर अत्याधुनिक पद्धतीच्या नंबर प्लेट्स बसवाव्या लागणार आहेत दोन हजार एकोणीस नंतर जी वाहने बाजारात आली आहेत. त्या वाहनांवर या नंबर प्लेट्स लावण्यात आल्या आहेत.