जळगाव (प्रतिनिधी) – येथील कांचननगरमध्ये राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाने काहीतरी कारणावरून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी. मकर संक्रांतीच्या दिवशी उघडकीस आली शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता.
यश रमेश राजपूत (वय १३, रा.कांचन नगर) असे मयत मुलाचे नाव आहे. सकाळी राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. यशचे वडील रमेश सुकलाल राजपूत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारदानचे काम करतात.
घटनास्थळी शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक बळीराम हिरे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन माहिती घेतली. १२ वर्षीय मुलाने मकर संक्रांतीच्या दिवशी गळफास घेतल्यामुळे शहरात शोककळा पसरली आहे.