पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रस्तावाला यश
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव व धरणगाव तालुक्यातील ५१ गावांमध्ये सौर पथदिवे व हायमास्ट दिवे बसविण्यासाठी १०१ कामांकरिता तब्बल १० कोटी १० लक्ष निधी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतर्गत शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत यावलचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.
त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनास केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन्ही तालुक्यातील ५१ गावांमधील आदिवासी वस्त्यां सौर दिव्यांनी लखलखणार आहे. यामुळे आदिवासी बांधवांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे. समाजातील दुर्लक्षित असलेल्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन दरबारी त्यांचा हक्काचा आवाज बनून अनेक प्रश्न मांडले आहे. ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी ठक्कर बाप्पा योजनेचा लाभ मिळत नव्हता.
या योजनेचा संपूर्ण आदिवासी समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ठक्कर बाप्पा योजनेची व्याप्ती वाढली आहे. या योजनेची अंमलबजावणी ३ फेब्रुवारी २०२३ नुसार सुरू करण्यात आली आहे. धरणगाव तालुक्यामधील ३८ गावांतील तसेच जळगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात १३ गावांमध्ये एकूण ५१ गावांमधील आदिवासी वस्त्यांमध्ये १०१ सौर पथ दिवे व हाय मस्ट लॅम्प बसविण्यासाठी तब्बल १० कोटी १० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.