बंडखोर अश्विन सोनवणे, कुलभूषण पाटील, सूर्यवंशी, कापसे कायम
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात माघारीच्या अंतिम दिवशी ३४ पैकी चौघांनी माघार घेतल्यामुळे तब्बल ३० उमेदवार रिंगणात राहिले आहे. यात भाजपचे बंडखोर उमेदवार अश्विन सोनवणे, मयूर कापसे, शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर कुलभूषण पाटील व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी यांनी माघार न घेतल्यामुळे आता रंगतदार लढती पाहायला मिळणार आहे.
असोदा येथील रहिवाशी सुरेश वामन भोळे, राजेश मंडोरे, अजीज सालार आणि सुनील महाजन यांनी माघार घेतली. यानंतर मात्र वेळ संपल्यावर चित्र स्पष्ट झाले. उमेदवारांना नंतर चिन्ह वाटप करण्यात आले.(केपीएन)यात राष्ट्रीय पक्ष असलेले उमेदवार अनुक्रमे मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना रेल्वे इंजिन, शिवसेना उबाठा गटाचे जयश्री सुनील महाजन यांना मशाल, बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार शैलजा राजेश सुरवाडे यांना हत्ती, भारतीय जनता पक्षाचे आ. राजूमामा भोळे यांना कमळ असे चिन्ह मिळाले आहे.
तर अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे यांना काचेचा ग्लास, कुलभूषण पाटील यांना कपाट, संग्रामसिंह सूर्यवंशी यांना स्कॅनर, मयूर कापसे यांना रोड रोलर, शिवराम पाटील यांना फलंदाज यासह इतर उमेदवारांना देखील चिन्ह वाटप करण्यात आले.(केपीएन)प्रांत विनय गोसावी, तहसीलदार शीतल राजपूत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. अखेरच्या दिवशी तहसील कार्यलयात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली.