चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पुरग्रस्त , अतिवृष्टीग्रस्तांना जळगावच्या जैन उद्योग समूहाची “स्नेहाची शिदोरी” म्हणून ३०० कुटुंबाना किराणा किटचे वाटप नुकतेच केले
चाळीसगाव तालुक्यात दोन महिन्यापासून अतिवृष्टी असल्याने महापुराची परिस्थिती निर्माण होत आहे, हातमजुरी करणाऱ्या कुटुंबाची परिस्थिती दयनीय झाली अनेकांचे संसारच पुरात वाहून गेल्याने नव्याने उभे राहण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. या कठीण काळात तालुक्याला मदत करण्याची विनंती आमदार मंगेश चव्हाण यांनी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांना केली त्यानांतर त्यांनी तात्काळ ३०० किराणा किटची स्नेहाची शिदोरी चाळीसगाव तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी पाठवून दिली. या किटचे वाटप शिवनेरी फाऊंडेशन अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज पिंपरखेड, गोरखपूर, करगाव, चैतन्य तांडा येथे गरजूंना करण्यात आले. वाटपाची जबाबदारी दिनकर राठोड, नमोताई राठोड, पवन देवरे, सम्राट सोंनवणे यांच्याकडे सोपविण्यात आली
राज्यात कुठेही संकट आले तेव्हा सामाजिक दायित्व म्हणून जैन उद्योग समूह नेहमीच मदतीसाठी अग्रेसर राहत आला आहे. पद्मश्री स्व.भवरलाल जैन यांचा दातृत्वाचा वारसा अशोकभाऊ जैन व त्यांचा परिवार पुढे नेत आहे, त्यांनी चाळीसगाव तालुक्यासाठी केलेल्या मदतीबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले.