जळगाव – येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग स्टुडंट वेलफेअर विभाग आणि महाराष्ट्र आरौगय विज्ञान विदयापिठ नाशिक, बहीशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संवाद कौशल्य विकास व्याख्यान व चर्चासत्र उत्साहात पार पडले.
पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रात रवींद्र बोरडे (जीटीटी फाउंडेशन, पुणे) यांनी नर्सिंग क्षेत्रातील संवाद कौशल्याचे महत्त्व ध्येय ठरवणे, प्रभावी संवाद, वेळेचे व्यवस्थापन, आत्मप्रेरणा आणि नेतृत्वगुण यावर मार्गदर्शन केले. दुसर्या दिवशी, (लैंगिक छळ प्रतिबंध) प्रशिक्षक शेख यांनी टिकाऊ विचार, समस्यांचे समाधान, निर्णय क्षमता, वैद्यकीय नैतिकता आणि आरोग्यसेवेतील ग्राहक सेवा यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच प्रभावी बायोडाटा बाबत महत्वाच्या सुचना दिल्या. व्यावसायिक सौंदर्य आणि करिअर तयारीवर ई-मेल शिष्टाचार, ऑनलाइन नोकरी अर्ज, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत कौशल्ये याव्दारे भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवासाठी व्यावहारिक उपक्रम, भूमिकानाट्य आणि वास्तव जीवनातील प्रकरण अभ्यास याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप अनुभवांच्या आणि शिकवणीच्या चर्चासत्राने झाला. २५ नर्सिंग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्राचार्या विशाखा गणवीर, उपप्राचार्या जेसिंथ धया, प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. रश्मी टेंबुर्ने, प्रा. स्वाती गाडेगोणे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर परिश्रम घेतले.पायल हांडे यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.