जळगाव तालुक्यातील उमाळा येथील घटना
निर्मलाबाई रघुनाथ बिऱ्हाडे (३५, रा. उमाळा, ता. जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. तालुक्यातील उमाळा येथे मजुरी काम करणाऱ्या निर्मलाबाई बिऱ्हाडे या नवरात्रोत्सवात ९ ऑक्टोबर रोजी घराजवळ गरबा खेळत होत्या. (केसीएन)त्या वेळी त्यांचा तोल जाऊन त्या खाली कोसळल्या व त्यांच्या डोक्याला तसेच पाठीला दुखापत झाली.
त्या वेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी कुटुंबीयांनी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा दिनांक १३ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक गणेश वंजारी करीत आहेत.