रावेर तालुक्यात सुकी नदी पुलावर घडली घटना
रावेर (प्रतिनिधी) : बऱ्हाणपुर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर वडगावनजीक सुकी नदी पुलावर मोटरसायकल व ब्रिझा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वडगाव येथील जावेद सत्तार तडवी (वय ३९) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. घटनेबद्दल सावदा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव येथील जावेद तडवी, वसीम करीम (वय ३०) व बबलू अशरफ (वय २७) हे तिघे सुझुकी मोटरसायकल (एमएच ४८ बीएक्स ७९२६) वरून सावदा येथे खरेदीसाठी गेले होते. (केसीएन)खरेदी करून परत येत असताना सुकी नदी पुलाजवळ रावेरहून सावदाकडे जाणाऱ्या ब्रिझा कार (एमएच १९ सीवाय १००७) ने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.या अपघातात जावेद तडवी यांचा जागीच मृत्यू झाला असून वसीम करीम व बबलू अशरफ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव हलविण्यात आले आहे. घटनेची सावदा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.