जळगाव (प्रतिनिधी) : – एक झाड डॉ. केतकीताई के नाम उपक्रमाअंतर्गत डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉप्यूटर अप्लिकेशन महाविद्यालयात वृक्षरोपण करण्यात आले.
या प्रसंगी वाढत्या तापमानवाढीवर वृक्षारोपण हेच औषध असून आपण वृक्षारोपण केले पाहिजे. वड, पिंपळासारख्या देशी आणि दीर्घायुष्य असणार्या वृक्षांची लागवड केल्यास प्रदूषण आणि तापमानाला आळा बसेल. वाढती जमिनीची धूप थांबेल. सर्वानी वृक्षारोपणाचा ध्यास घेऊन देशी वृक्षांची लागवड करूया, असे आवाहन प्रा. योगिता घोंगडे यांनी केले. या प्रसंगी वड आणि प्रत्येकी पाच पिंपळ आणि नारळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा. स्मिता चौधरी, प्रा. वैजयंती असोदेकर, प्रा. आफरीन खान, प्रा. चारुशीला चौधरी, प्रा. मिताली शिंदे, प्रा.तेजल पाटील, प्रा. लीना पाटील आदी उपस्थित होते.