जळगाव (प्रतिनिधी) – येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आषाढी एकादशी निमीत्त टाळमृदंगाच्या साथीने गजर करण्यात आला.
भारतीय संस्कृती ही वेगवेगळ्या मूल्यांची खाण आहे, त्यात प्रमुख मूल्य म्हणजे अध्यात्मिक मूल्य.. हे मूल्य मानवी जीवनाची आधारशिला मानली जाते आणि अशा या मूल्यांच रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये व्हावी या हेतूने शाळेत विविध सण-उत्सवादरम्यान उपक्रम राबविले जातात.आषाढी एकादशीच्या निमित्तान अभंग, भजन, नाटिका तसेच विठ्ठलाच्या वारीचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय संस्कृती ही वेगवेगळ्या मूल्यांची खाण आहे, त्यात प्रमुख मूल्य म्हणजे अध्यात्मिक मूल्य.. हे मूल्य मानवी जीवनाची आधारशिला मानली जाते आणि अशा या मूल्यांच रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये व्हावी या हेतूने शाळेत विविध सण-उत्सवादरम्यान उपक्रम राबविले जातात.आषाढी एकादशीच्या निमित्तान अभंग, भजन, नाटिका तसेच विठ्ठलाच्या वारीचे आयोजन करण्यात आले होते.
चिमुकल्यांनी वारकरी ची वेशभूषा परिधान केली व माऊलींच्या गजरात विठ्ठलाच्या अभंगाचे सादरीकरणाला सुरुवात केली, उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला, . भक्त पुंडलिकाच्या नाटकाद्वारे आषाढी एकदाशीचे महत्व काय याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी याउद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा आणि गीतांचे सादरीकरण यामुळे भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली. तसेच विद्यार्थी जरी इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेत असले तरी त्यांना आपली भारतीय संस्कृती, प्राचीन परंपरा माहिती असाव्यात याकरीता सण-उत्सवांचे औचित्य साधत कार्यक्रम घेतले जातात. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्राचार्य अनघा पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.